काल, काही तासात झुंपा लाहिरी चे “नेमसेक” वाचून काढले. खूप कमी अशी पुस्तके आहेत, जे एकदा का हातात घेतले की वेळेचं आणि भुकेचं भान राहत नाही. “नेमसेक”, त्या गटातलं एक पुस्तक. ह्या पुस्तकावर आधारीत त्याच नावाचा एक चित्रपट ही आहे, तो मी अजून बघितला नाही (आणि आता विशेष इच्छा पण नाही राहिली). पुस्तक वाचताना जे चित्र मनात उभे झाले, ते कदाचित पुसलं जाईल.

नावात ओळखी चा शोध – असा ह्या पुस्तकाचा ग्रंथ-परिचय.

जेव्हा अस्मिता चा प्रश्न येतो, तेव्हा, नेहमी अश्या गोष्टींचे मुख्य पात्र भारतीय अप्रवासी का असतात? भारतात राहणाऱ्यांना असा प्रश्न कधी येत नाही का?